टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप   

अनेक महिन्यांपासून ठेकेदार गायब

मंचर, (प्रतिनिधी) : टाव्हरेवाडी ता. आंबेगाव येथील अवसरी बुद्रुक ते टाव्हरेवाडी -पिंपळगाव रस्त्यावरील असणार्‍या ओढ्यावरील स्मशानभूमी शेजारी गेल्या काही महिन्यांपूर्वी पुलाचे काम ठेकेदाराने अद्यापही पूर्ण केले नसल्याने ऐन पावसाळ्यात स्थानिक ग्रामस्थांना  मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामाकडे ठेकेदार फिरकला देखील नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. दोन, तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे या पुलाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या पुलावरून पाणी गेल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे अर्धवट असलेल्या पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने तात्काळ सुरू करावे, अशी मागणी आंबेगाव तालुका सरपंच परिषद अध्यक्ष उत्तमराव टाव्हरे यांनी केली आहे.
 
टाव्हरेवाडी - अवसरी गावाला जोडणार्‍या ओढ्यावर असणान्या जुन्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यावर पुलावरून पाणी वाहत असे. त्यामुळे शाळेच्या मुलांची, दुध, पालेभाज्या, करणारी तसेच सर्व टाव्हरे वाडीतील ग्रामस्थांची वाहतूक विस्कळीत होत होती. नवीन पुलासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे ६० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन पुलाचे काम सुरू झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे काम बंद पडले आहे. 
 
टाव्हरेवाडी येथे ये - जा करण्यासाठी या पुलाचे काम सुरू असताना या पुलाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात दुसरा पूल बांधण्यात आला आहे. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला आहे. पुलाचे काम करणारा संबंधित ठेकेदार गेले काही दिवस इकडे फिरकलाच नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठेकेदाराने नविन पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे व स्थानिक ग्रामस्थांची समस्या दूर करावी अशी मागणी टाव्हरेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
 
अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामाकडे ठेकेदार फिरकला देखील नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. दोन, तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे या पुलाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या पुलावरून पाणी गेल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे अर्धवट असलेल्या पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने तात्काळ सुरू करावे .
 
- उत्तमराव टाव्हरे, माजी सरपंच, टाव्हरेवाडी. 
 

Related Articles